अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

जालना- व्यापाऱ्याचे तब्बल १ कोटी २९ लाख परत मिळवले

 जालना सायबर पोलिसांची मोठी कामगिरी


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    सायबर गुन्ह्यांतून त्रस्त झालेल्या व्यापाऱ्याला दिलासा देत जालना सायबर पोलीसांनी तब्बल ₹ १ कोटी २९ लाखांची रक्कम परत मिळवण्यात यश मिळवले आहे. ही कारवाई जालना जिल्हा पोलिसांसाठी तसेच जिल्ह्यातील व्यापारी समाजासाठी दिलासा देणारी ठरली आहे.

     जालना शहरातील व्यंकटेश ऑईल मिल चे मालक यांनी २६ फेब्रुवारी रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत असे नमूद केले होते की, आरोपी कपिल दोषी व यश दोषी (रा. आकोला) यांनी संगनमत करून गुजरातमधील सफल ऑईल अँड सीड्स, अहमदाबाद चे संचालक ललितकुमार जैन तसेच महावीर अॅग्रो, सुरत चे संचालक नरेश शहा यांच्या माध्यमातून ९६ मेट्रिक टन सोया रिफाईन खाद्यतेल पुरवतो असे सांगत फिर्यादीची तब्बल ₹१ कोटी २९ लाखांची फसवणूक केली होती. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    सायबर पोलीसांनी तांत्रिक तपास करून संशयित आरोपींच्या बँक खात्यांचा मागोवा घेतला. या खात्यांवर तत्काळ कारवाई करून त्यांना गोठवण्यात आले आणि अखेर फसवणूक झालेली तब्बल ₹ १ कोटी २९ लाखांची रक्कम व्यापाऱ्याच्या खात्यात परत मिळवून देण्यात आली.

    या कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी समाधान व्यक्त करत पोलीस निरीक्षक गुणाजी शिंदे आणि त्यांच्या सायबर पथकाचे कौतुक केले आहे.

     या यशस्वी ऑपरेशनमध्ये पोलीस निरीक्षक गुणाजी शिंदे, पोउपनि योगेश चव्हाण, पोउपनि सुनिल पाटोळे, पोहेकॉ सचिन चौधरी, पोहेकॉ संदीप मांटे, पोकॉ दिलीप गुसींगे व सायबर पथकाचा सहभाग होता.

Comments

Popular posts from this blog