घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

घनसावंगी - अपहरण व खून प्रकरणातील चारही आरोपींना वाहनासह अटक

आरोपींनी सुरेश तुकाराम आर्दड याचे अपहरण करून खून केल्याची कबुली | गेवराई (बीड) येथून सर्व आरोपींना ताब्यात


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    दिनांक २८ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास कुंभार पिंपळगाव येथे घडलेल्या शोकांतिक अपहरण व खून प्रकरणात घनसावंगी पोलिसांनी दि ४ जुलै रोजी फरार चारही आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी सुरेश तुकाराम आर्दड (रा. राजाटाकळी, ता. घनसावंगी) याचे जुन्या वैयक्तिक वादातून अपहरण करून नंतर खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.


घटनेचा क्रमवार तपशील

      दिनांक २८ जून रोजी रात्रीच्या सुमारास, आरोपींनी एकत्र येऊन कट रचला. त्यांनी गावठी कट्टा व कुऱ्हाडीचा धाक दाखवत सुरेश आर्दड याला जबरदस्तीने एका पांढऱ्या चारचाकी वाहनात बसवून अपहरण केले. यावरून घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

 २९ जून रोजी सकाळी ११ वाजता, पोलिसांना माहिती मिळाली की पोलीस ठाणे किनगाव राजा (बुलढाणा) हद्दीतील तळेगाव शिवारातील रस्त्यालगत एका अनोळखी पुरुषाची प्रेत आढळून आली आहे. वर्णन मिळतेजुळते असल्यामुळे तपास पथकाने नातेवाईकांना पाठवून प्रेताची ओळख पटवली, व ती व्यक्ती सुरेश तुकाराम आर्दड असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिस तपासात आरोपींनी गळा दाबून हत्या केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गुन्ह्यात BNS कलम 103(1), 61(2) अंतर्गत खुनाचा आरोप देखील जोडण्यात आला.

 फरार आरोपींची अटक, खून करून फरार झालेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे

1. हरी कल्याण तौर (28 वर्षे, रा. राजाटाकळी)

2. सखाराम ऊर्फ खन्ना बप्पासाहेब आर्दड (28 वर्षे, रा. राजाटाकळी)

3. हिनाज बाबामिया सैय्यद (32 वर्षे, रा. कुंभार पिंपळगाव)

4. महादेव अंबादास आव्हाड (28 वर्षे, रा. एकलहरा, जि. छ. संभाजीनगर)

    पोलिसांनी या आरोपींचा माग काढण्यासाठी जालना, बुलढाणा व छ. संभाजीनगर जिल्ह्यांत शोध मोहीम राबवली. आरोपी सतत ठिकाणं बदलून पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर, पोलीस निरीक्षक केतन राठोड यांच्या नेतृत्वाखाली गोपनीय माहितीच्या आधारे, दिनांक ४ जुलै रोजी गेवराई (जि. बीड) येथे सापळा रचून सर्व आरोपींना वाहनासह अटक करण्यात आली.

     सर्व आरोपींना मा. न्यायालयात हजर करण्यात आले असून 07/07/2025 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे. तपास अधिक गतीने सुरू असून, हत्येचे नेमके कारण व अन्य कोण सहभागी होते का, याचा शोध घेणे सुरू आहे.

या यशस्वी कामगिरीमध्ये सहभाग

    ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, व उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल कृष्णा खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली घडली.

संपूर्ण तपासात योगदान देणारे अधिकारी आणि कर्मचारी

    पोलीस निरीक्षक केतन राठोड, सहाय्यक पो.नि. अशोक खरात, पोहवा रंजीत वैराळ,पोशि राधेश्याम गुसिंगे,पोशि प्रकाश पवार,पोशि सुनिल वैद्य,पोशि संतोष एसलोटे

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या