अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

रमी खेळ झाला डोईजड! अखेर माणिकराव कोकाटेंना कृषी खात्यापासून हटवलं; दत्ता भरणे नवे कृषी मंत्री

 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे खातेफेर झाले असून, कृषी खात्याची जबाबदारी अखेर माणिकराव कोकाटे यांच्याकडून काढून घेण्यात आली आहे. त्यांच्या जागी विद्यमान क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे यांच्याकडे कृषी मंत्रालयाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. कोकाटे यांच्याकडे आता "क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ" ही खाती देण्यात आली आहेत.

     सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीच्या नियम ५ नुसार राज्यपालांनी मुख्यमंत्री यांच्या सल्ल्यानुसार ही महत्त्वाची सुधारणा मनिर्धा वर्मा, अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी जारी केली.

खात्यांच्या फेरबदलाची अधिकृत अधिसूचना

    सामान्य प्रशासन विभागाच्या क्रमांक शाकानि-२०२४/प्र.क्र.८६/रवका-१ अन्वये अधिसूचनेत पुढीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत:

1. नोंद क्रमांक २२ — श्री. दत्तात्रय भरणे यांच्याजवळील "क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ" या खात्याऐवजी "कृषी" हे खाते दिले गेले आहे.

2. नोंद क्रमांक २५ — अॅड. माणिकराव कोकाटे यांच्याकडील "कृषी" खाते काढून घेऊन त्यांच्याकडे आता "क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ" ही खाती सोपवण्यात आली आहेत.

‘रमी खेळ झाला डोईजड’ — खातेफेरामागील संभाव्य राजकीय पार्श्वभूमी

     राजकीय वर्तुळात या खातेफेराचे विविध अर्थ लावले जात असून, मागील काही दिवसापासून कृषी खात्याच्या कार्यपद्धतीवर टीका होत होती. अनेक शेतकरी संघटनांनी कोकाटे यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली होती. तसेच, काही आर्थिक निर्णय आणि धोरणांबाबतही सरकारच्या अडचणी वाढत होत्या. त्याचा थेट परिणाम म्हणून कोकाटे यांची कृषी मंत्रालयातून हकालपट्टी झाल्याचे बोलले जात होते.

     दत्ता भरणे हे शांत, संयमी आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले मंत्री म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी देऊन सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अधिक ठोसपणे काम करण्याचा संकेत दिला आहे.


Comments

Popular posts from this blog