घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीच्या नियम ५ नुसार राज्यपालांनी मुख्यमंत्री यांच्या सल्ल्यानुसार ही महत्त्वाची सुधारणा मनिर्धा वर्मा, अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी जारी केली.
सामान्य प्रशासन विभागाच्या क्रमांक शाकानि-२०२४/प्र.क्र.८६/रवका-१ अन्वये अधिसूचनेत पुढीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत:
1. नोंद क्रमांक २२ — श्री. दत्तात्रय भरणे यांच्याजवळील "क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ" या खात्याऐवजी "कृषी" हे खाते दिले गेले आहे.
2. नोंद क्रमांक २५ — अॅड. माणिकराव कोकाटे यांच्याकडील "कृषी" खाते काढून घेऊन त्यांच्याकडे आता "क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ" ही खाती सोपवण्यात आली आहेत.
राजकीय वर्तुळात या खातेफेराचे विविध अर्थ लावले जात असून, मागील काही दिवसापासून कृषी खात्याच्या कार्यपद्धतीवर टीका होत होती. अनेक शेतकरी संघटनांनी कोकाटे यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली होती. तसेच, काही आर्थिक निर्णय आणि धोरणांबाबतही सरकारच्या अडचणी वाढत होत्या. त्याचा थेट परिणाम म्हणून कोकाटे यांची कृषी मंत्रालयातून हकालपट्टी झाल्याचे बोलले जात होते.
दत्ता भरणे हे शांत, संयमी आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले मंत्री म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी देऊन सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अधिक ठोसपणे काम करण्याचा संकेत दिला आहे.
Comments
Post a Comment