घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

केलेल्या कामाचे पैसे वेळेवर न मिळाल्यामुळे कंत्राटदारांने जीवन संपवले

थकीत बिले, तोकडी आश्वासने आणि शासनाची उदासीनता- गुत्तेदारानो सावधान !


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक हृदयद्रावक घटना संपूर्ण राज्याला हादरवून गेली आहे. हर्षल पाटील या तरुण, उत्साही अभियंता कंत्राटदाराने शासनाच्या दुर्लक्षित धोरणांना आणि आर्थिक संकटाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आलीय. त्यांचे वय अवघे ३० च्या आसपास. त्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे १ कोटी ४० लाख रुपयांचे काम प्रामाणिकपणे पूर्ण केले होते. मात्र, महिनोनमहिने बिले थकवून ठेवणाऱ्या यंत्रणेने त्यांना अंतर्गतरीत्या पोखरून टाकले. असा आरोप होत आहे.

     हर्षल यांनी या प्रकल्पासाठी ६५ लाखांचे कर्ज घेतले होते. काम पूर्ण करूनही शासनाने पैसे न दिल्यामुळे कर्जाची परतफेड शक्य झाली नाही. दिवसेंदिवस व्याजाचा बोजा वाढत गेला, त्यात अधिकाऱ्यांकडून मिळणारी टाळाटाळ, अपमानास्पद वागणूक आणि आर्थिक तणाव यामुळे ते तणावाखाली गेले. अनेक प्रयत्न, हेलपाटे, अर्जविनंत्या केल्यानंतरही बिले मंजूर झाली नाहीत. या सगळ्या परिस्थितीने हर्षलला नैराश्याच्या गर्तेत लोटलं.

    ही आत्महत्या एक वैयक्तिक घटना नाही, तर शासनाच्या अपयशी व्यवस्थेचे भयानक परिणाम आहे. माहितीनुसार राज्यभरातील कंत्राटदारांचे तब्बल ८० हजार कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम केवळ आकड्यांमध्ये मर्यादित नसून, ती हजारो कुटुंबांच्या पोटापाण्याचा, अस्तित्वाचा प्रश्न आहे. शासनाने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कंत्राटे वाटप तर केली, पण त्यामागची आर्थिक तयारी केली नाही. परिणामी, काही कंत्राटदार अडचणीत सापडले आणि अनेकजण कर्जबाजारी झालेत.असा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे.

    जलजीवन मिशनच्या नावाखाली सुरू असलेल्या विकासकामांचा लाभ लोकांपर्यंत पोहचण्याआधीच अनेक तरुण कंत्राटदार अडचणीत सापडत आहेत. हर्षल पाटील यांचे दुःखद निधन ही केवळ एक घटना नाही, तर भविष्यात होणाऱ्या अशाच आणखी घटनांची जाणीव करून देणारी एक गंभीर इशारा आहे.

    शासनाच्या या बेजबाबदार वागण्याने केवळ हर्षलचे कुटुंबच नव्हे, तर त्यांच्यासोबत काम करणारे मजूर, पुरवठादार, आणि इतर अनेक कुटुंबेही संकटात सापडली आहेत. आता हर्षलसारखे आणखी किती कंत्राटदार बळी जाणार, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या