अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील सुनीता सपकाळ (वय ४२) आणि संगीता सपकाळ (वय ४०) या दोन महिला बुडून मृत झाल्या असून त्यांचे मृतदेह स्थानिक कोळी समाजाच्या मदतीने नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. तिसऱ्या महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून तिचा शोध प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.
सकाळी सुमारे सात वाजता या महिला चंद्रभागा नदी पात्रात स्नानासाठी उतरल्या होत्या. उजनी धरणातून नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सध्या चंद्रभागेची पाणी पातळी वाढलेली आहे व प्रवाह अतिशय वेगवान आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे या तिन्ही महिला बुडाल्या असे समजते.
स्नानासाठी गेलेल्या महिलांना पाण्याचा अंदाज येत नसतानाच, नदीतील प्रवाहाने त्यांना ओढून नेले. सोबत असलेल्या इतर महिलांनी आरडाओरड करत मदतीसाठी हाक दिली. मात्र तोपर्यंत तिन्ही महिला पाण्यात गडप झाल्या होत्या.
स्थानिक नागरिक आणि कोळी समाजाच्या मदतीने दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र तिसऱ्या महिलेचा शोध अजूनही सुरू असून प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी कार्यरत आहेत.
नुकत्याच आषाढी दिंडीत अंबड तालुक्यातील झिरपी येथील एक युवकाचा ही पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.
Comments
Post a Comment