अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

चंद्रभागेत तीन महिला बुडाल्या ! जालन्यातील दोन

जालना जिल्ह्याच्या दोन महिला भाविकांचा मृत्यू, तिसऱ्या महिलेचा शोध सुरू


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात आलेल्या भाविकांसाठी आजचा दिवस अत्यंत दुर्दैवी ठरला. चंद्रभागा नदीत स्नानासाठी उतरलेल्या तीन महिला भाविक बुडाल्याची धक्कादायक घटना आज १९ जुलै शनिवार रोजी उघडकीस आली.


    सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील सुनीता सपकाळ (वय ४२) आणि संगीता सपकाळ (वय ४०) या दोन महिला बुडून मृत झाल्या असून त्यांचे मृतदेह स्थानिक कोळी समाजाच्या मदतीने नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. तिसऱ्या महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून तिचा शोध प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.

      सकाळी सुमारे सात वाजता या महिला चंद्रभागा नदी पात्रात स्नानासाठी उतरल्या होत्या. उजनी धरणातून नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सध्या चंद्रभागेची पाणी पातळी वाढलेली आहे व प्रवाह अतिशय वेगवान आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे या तिन्ही महिला बुडाल्या असे समजते.

    स्नानासाठी गेलेल्या महिलांना पाण्याचा अंदाज येत नसतानाच, नदीतील प्रवाहाने त्यांना ओढून नेले. सोबत असलेल्या इतर महिलांनी आरडाओरड करत मदतीसाठी हाक दिली. मात्र तोपर्यंत तिन्ही महिला पाण्यात गडप झाल्या होत्या.

    स्थानिक नागरिक आणि कोळी समाजाच्या मदतीने दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र तिसऱ्या महिलेचा शोध अजूनही सुरू असून प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी कार्यरत आहेत.

  नुकत्याच आषाढी दिंडीत अंबड तालुक्यातील झिरपी येथील एक युवकाचा ही पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

   दरम्यान तीर्थस्थळी अशा घटना वारंवार समोर येत असून भाविक भक्तांनी नदीतच अंघोळ केल्याने पुण्य मिळते या भ्रमात न राहता अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्याला जर पोहताच येत नसेल तर नदीच्या काठावरच अंघोळ करावी, जास्त पाण्याच्या प्रवाहापासून दूर रहावे, सोबत कुटुंबातील कोणी तरी असेल तरच पाण्यात जावे आदी खबरदारी घेतली तर अशा घटना शकतो घडणार नाहीत. म्हणून प्रत्येकानं काळजी व खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे... वास्तव न्युज मराठी

Comments

Popular posts from this blog