घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात असताना काळाचा घाला: भीषण अपघातात तरुण ठार

 कुंभार पिंपळगाव-घनसावंगी रस्त्यावर दोन दुचाकीचा भीषण अपघात:गावात शोककळा


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     कुंभार पिंपळगाव ते घनसावंगी रस्त्यावर ११ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या शंकर लक्ष्मणराव कंटुले (वय अंदाजे ३२) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. हा अपघात सिंदखेड परिसरात झाला. 

    मिळालेल्या माहितीनुसार, शंकर कंटुले हे दुचाकीवरून काल ११ जुलै शुक्रवार रोजी निघाले होते. मात्र, सिंदखेड जवळ दोन दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. 

     अपघातानंतर शंकर कंटुले यांना तातडीने प्राथमिक उपचार करून गंभीर अवस्थेमुळे छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु दुखापतीचे स्वरूप गंभीर असल्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि अखेर १२ जुलै रोजी (शनिवार) उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 

   दरम्यान शंकर आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अंबड येथे चालले होते अशी माहिती मिळाली.

   शंकर कंटुले याच्यावर आज कुंभार पिंपळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे. त्याच्या संपर्कात असलेल्या कुटुंबीयांना व गावकऱ्यांना या अपघाताने प्रचंड धक्का बसला असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या