ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट! तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही केली आत्महत्या

वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
रविवार सुट्टी असल्याने अनेक पर्यटक नदीकाठी पर्यटनासाठी आले होते. नदीच्या काठावर आणि पुलावर पर्यटकांचा मोठा जमाव असताना अचानक पूल कोसळल्याने अनेकजण थेट पाण्यात पडले. जोरदार पावसामुळे नदीला पूर आला होता, ज्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली.
स्थानिक ग्रामस्थांनी आणि आपत्कालीन सेवांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केलं. अद्यापही अनेकजण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे.
घटना रविवारी दुपारी सुमारे ३ ते ४ दरम्यान घडली
पुलावर पर्यटकांची मोठी गर्दी होती
पूल कोसळताच अनेकजण थेट नदीत पडले
प्रशासन, पोलीस आणि NDRF यांचे संयुक्त बचावकार्य सुरू
बेपत्ता पर्यटकांच्या नातेवाईकांमध्ये हळहळ आणि अस्वस्थता
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी परिसर सील करून वाहतूक बंद केली आहे. पूल कोसळण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र प्राथमिक अंदाजानुसार पूल जुनाट आणि दुर्लक्षित अवस्थेत होता. ही घटना पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेच्या व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत सांगितले की प्राथमिक माहितीनुसार २ लोकांचा मृत्यू झाला आहे.
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व संबधित तहसीलदार यांच्याशी सातत्याने संपर्कात असल्याचे असून काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध सुरु आहे. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे.
आतापर्यंत सहा जणांना वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ३२ लोक जखमी असून त्यापैकी ६ गंभीर आहेत. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले आहे. स्वतः विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत असे सांगितले.
Comments
Post a Comment