ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट! तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही केली आत्महत्या

Image
  व्यसनाचा भीषण शेवट- कुटुंबातिल तिघांचा झाला दुर्दैवी अंत.. वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      एक अत्यंत दुर्दैवी व अंगाला शहारे आणणारी हृदयद्रावक घटना समोर आलीय ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट झाला असून कर्जबाजारीपणामुळे तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही आत्महत्या करत कुटुंबाचा अंत केला.      धाराशिव जिल्ह्यातील बावी (ता. कळंब) या गावात ऑनलाइन जुगाराच्या व्यसनाने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या लक्ष्मण जाधव या तरुण ट्रॅक्टर चालकाने आपल्या पत्नी आणि चिमुकल्या मुलाला संपवून स्वतः आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून, संपूर्ण गाव शोकाकुल वातावरणात आहे. आर्थिक अडचणीतून दुर्दैवी पाऊल    मिळालेल्या माहितीनुसार, मृत लक्ष्मण जाधव (वय अंदाजे ३०) हा गावातील कष्टकरी ट्रॅक्टर चालक होता. काही महिन्यांपासून त्याला ऑनलाइन रम्मी या मोबाईल गेमचं अतिशय व्यसन जडलं होतं. सुरूवातीला कमी रकमेने खेळत असताना काहीवेळा जिंकल्यामुळे त्याला त्या गेमची सवय लागली. मात्र...

पुणे हादरलं! नदीवरील पूल कोसळला-६ जणांचा मृत्यू, २५ बेपत्ता

 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     मावळ तालुक्यातील कुडमळा येथे आज रविवारी एक भीषण आणि दुर्दैवी घटना घडली. इंद्रायणी नदीवरील पूल अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली असून, मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी स्थानिक प्रशासन, पोलीस, आणि आपत्ती व्यवस्थापन दल बचावकार्य करत असून, २० ते २५ पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

    रविवार सुट्टी असल्याने अनेक पर्यटक नदीकाठी पर्यटनासाठी आले होते. नदीच्या काठावर आणि पुलावर पर्यटकांचा मोठा जमाव असताना अचानक पूल कोसळल्याने अनेकजण थेट पाण्यात पडले. जोरदार पावसामुळे नदीला पूर आला होता, ज्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली.

    स्थानिक ग्रामस्थांनी आणि आपत्कालीन सेवांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केलं. अद्यापही अनेकजण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे.


मुख्य बाबी

घटना रविवारी दुपारी सुमारे ३ ते ४ दरम्यान घडली

पुलावर पर्यटकांची मोठी गर्दी होती

पूल कोसळताच अनेकजण थेट नदीत पडले

प्रशासन, पोलीस आणि NDRF यांचे संयुक्त बचावकार्य सुरू

बेपत्ता पर्यटकांच्या नातेवाईकांमध्ये हळहळ आणि अस्वस्थता

    मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी परिसर सील करून वाहतूक बंद केली आहे. पूल कोसळण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र प्राथमिक अंदाजानुसार पूल जुनाट आणि दुर्लक्षित अवस्थेत होता. ही घटना पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेच्या व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करते.

     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत सांगितले की प्राथमिक माहितीनुसार २ लोकांचा मृत्यू झाला आहे.

   विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व संबधित तहसीलदार यांच्याशी सातत्याने संपर्कात असल्याचे असून काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध सुरु आहे. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे.

   आतापर्यंत सहा जणांना वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ३२ लोक जखमी असून त्यापैकी ६ गंभीर आहेत. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले आहे. स्वतः विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत असे सांगितले.

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!