घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव: अमुची शान, अमुचा अभिमान बैलगाडीवरही भगवा

 



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

  अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, ज्यांनी कधीही आपली मान झुकवली नाही अशा श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रातील प्रत्येक कोपऱ्यात शिवजयंतीचे अनोखे महत्त्व आहे. गावोगावी उत्सव साजरा केला जातो, ज्यामध्ये सर्वत्र भगव्या ध्वजांचे दर्शन होते. हे भगवे ध्वज केवळ उत्सवाचेच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, स्वराज्य आणि आत्मसन्मानाचे प्रतीक म्हणून उंचावतात.


  यंदाच्या शिवजयंतीतही गावागावात आणि शहरांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. लोकांच्या अंगात शिवरायांचा अभिमान आणि त्यांच्या पराक्रमाची आठवण प्रत्येक कार्यक्रमातून जाणवत होती. गावात सणाचे वातावरण असताना, ऊस तोडणी मजुरांच्या बैलगाड्यांवरही भगवा ध्वज उंच फडकताना पाहायला मिळाला, ज्यामुळे त्यांच्या स्वराज्याच्या प्रेमाची आणि शिवरायांच्या प्रतिमेवरील श्रद्धेची साक्ष मिळाली.


  घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे असाच एक प्रसंग बघायला मिळाला. ऊस तोडणी मजुरांच्या बैलगाडीवर भगवा ध्वज अभिमानाने फडकत होता. ही दृश्यं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे आणि त्यांच्याप्रती असलेल्या आदराचे प्रतीक होती. हे छायाचित्र संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचवण्यास महत्त्वपूर्ण ठरले आहे.


  भगवा ध्वज आजही महाराजांच्या विचारांचे, स्वराज्याचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हा सर्वसामान्य जनतेसाठी एक दीपस्तंभ आहे, आणि त्यांची जयंती हा त्या गौरवशाली इतिहासाचा साक्षात्कार आहे.

Comments

  1. शिवप्रेमींच अभिनंदन

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या