घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

जालना वाळूमाफियांविरुद्ध धडाकेबाज कारवाई; अडीच कोटीचा मुद्देमाल जप्त

आयपीएस सिद्धार्थ बारवाल यांची मध्यरात्री वेशांतर करून वाळूमाफियांविरुद्ध कारवाई अडीच कोटीचा मुद्देमाल जप्त 

दुधना पात्रातून अवैधरित्या वाळू तस्करी करणाऱ्या पाच हायवासह दोन जेसीबी पकडले; सुमारे 2.5 कोटींचा मुद्देमाल जप्त



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

  जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव शिवारातून जाणाऱ्या दुधना नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन करत असलेल्या वाळू तस्करांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आयपीएस सिद्धार्थ बारवाल यांनी धडाकेबाज कारवाई केली आहे. ही कारवाई मध्यरात्री वेशांतर करून हायवामधून नदीपात्रात पोहोचून करण्यात आली.


  माहितीनुसार, अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आयपीएस सिद्धार्थ बारवाल यांना दुधना नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी वेशांतर करून आणि साध्या गणवेशातील पोलीस कर्मचारी घेऊन कारवाईची योजना आखली.

  मध्यरात्री एका वाळू तस्करी करणाऱ्या हायवा वाहनातून स्वतः आयपीएस बारवाल नदीपात्र गाठले. यावेळी वाळू उपसा करणाऱ्या तस्करांना पोलिसांची साधी शंका येऊ नये यासाठी ही मोहीम अत्यंत गुप्तपणे राबविण्यात आली. आयपीएस बारवाल हायवातून उतरताच त्यांच्या सोबतच्या पोलिसांनी वाळू उपसा करणाऱ्या हायवा आणि जेसीबी वाहनांना घेराव घालून ताब्यात घेतले.

 या कारवाईत एकूण पाच हायवा आणि दोन जेसीबी वाहने पकडण्यात आली आहेत. पकडलेल्या वाहनांच्या मदतीने केलेल्या तस्करीचे मूल्य सुमारे 2 कोटी 35 लाख रुपयांचे असल्याचे समजते. यावेळी पाच वाळूतस्करांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी रोखण्यात आली आहे.

 ही धडाकेबाज मोहीम मध्यरात्री 1 वाजता सुरू होऊन सकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होती. या मोहिमेत आयपीएस सिद्धार्थ बारवाल यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक एस.व्ही. ठुबे, भगवान नरोडे, हवालदार विष्णू चव्हाण, दीपक पाटील आणि श्री. तायडे आदी पोलीस कर्मचारी आणि फौजफाटा सहभागी झाला होता.

 वाळू तस्करीचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी केलेली ही धाडसी कारवाई पोलिसांच्या कार्यक्षमतेचे एक उत्तम उदाहरण ठरली आहे.

 दरम्यान इतर काही पोलिस विभाग व महसूल विभागाने असा आदर्श घेणे गरजेचे असून आपली पद, खुर्ची नुसती दाखवण्यासाठी नाही तर अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्यासाठी आहे. मात्र काही ठिकाणी पाणी मुरत असल्यामुळे याचा विसर काही अधिकाऱ्यांना पडतो की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या