घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

शॉर्ट सर्किटमुळे चाळीस एकर ऊस जाळून खाक

विजेच्या तारा स्पर्श होऊन लागलेल्या आगीत 40 ते 45 एकर ऊस जळून खाक; हनुमंतखेडा येथे मोठे नुकसान


  जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील हनुमंतखेडा येथे काल रविवारी विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत 40 ते 45 एकर ऊस जळून खाक झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या आगीत सुमारे पन्नास एकरातील ऊसाचे मोठे नुकसान झाले असून, 10 ते 12 शेतकऱ्यांना या आगीचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीचे एक वर्षाच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे, ज्यामुळे त्या सर्वांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

  घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार, विजेच्या तारा एकमेकांना स्पर्श झाल्याने अचानक शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे विजेच्या तारा खालच्या उसाच्या शेतात पडल्याने काही क्षणांतच आगीने उग्र रूप धारण केले. त्या आगीमध्ये ऊसाचे क्षेत्र ताबडतोब जळून खाक झाले. या आगीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.


स्थानिक प्रशासनाची मदत

  आगीची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे लक्षात घेता, घटनास्थळावर अग्निशामक दलाच्या गाड्या पाठविण्यात आल्या. तथापि, आगीचा प्रचंड वेग असल्याने तोपर्यंत जवळपास 40 ते 45 एकरातील ऊस पूर्णपणे जळून गेला होता.

  शेतकऱ्यांच्या कष्टांचे मोठे नुकसान झाल्याने या सर्व शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे. स्थानिक प्रशासनाने या शेतकऱ्यांची अडचण पाहता, योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या