घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीला स्थगिती

 राज्य शासनाचा निर्णय



    दि. २५ फेब्रुवारी, २०२५, मुंबई - महाराष्ट्र शासनाने जालना आणि बदनापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमास पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. यास कारण ठरले आहे समित्यांच्या विभाजनासंबंधित प्रलंबित न्यायप्रविष्ट प्रकरणे. राज्य शासनाने हा निर्णय उच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या आधारे घेतला आहे.

    जालना जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करुन दोन स्वतंत्र बाजार समित्या अस्तित्वात आल्या होत्या - एक जालना आणि दुसरी बदनापूर या ठिकाणी. विभाजनासंबंधीचे आदेश जिल्हा उपनिबंधक, जालना यांनी ६ जून २०२२ रोजी जारी केले होते. त्या पार्श्वभूमीवर, दोन्ही समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी ४ फेब्रुवारी २०२५ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.


   मात्र, जालना-बदनापूर विभाजनाशी संबंधित प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे आणि त्यात होणाऱ्या संभाव्य गुंतागुंतीला विचारात घेऊन, राज्य शासनाने निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयाने २९ जुलै २०२२ रोजी दिलेल्या निर्देशांचा विचार करून हा निर्णय घेतला गेला आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या